अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस, हीच आहे महाराष्ट्राची ओळख ! कपाळी कुंकू, डोक्यावरती पदर हीच आहे सौभाग्याची ओळख ! सांडलेल्या रक्तात सुद्धा दिसणार नाही काळोख.....! " मराठी" आहोत आम्ही या पेक्षा काय वेगळी असणार आमची ओळख..!
Friday, July 15, 2011
आईपासून दूर गेल्यावर
|| घरापासून दूर || घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे |तुझ्या मायेचा छायेत बिनधास्त होतो, आता राख्राखत उन आहे ||प्रत्येकजन इथे फक्त स्वतःपुरता विचार करतो |दुसऱ्याचा मनाचा विचार न करता बेधडक टीका करतो |दूर जाऊन कळले मला हे जग खूप स्वार्थी आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||.स्वप्नांच्या ह्या नगरीत सगळे लाखोनमध्ये एकटे असतात |स्वतःला पुढे जायचे म्हणून दुसऱ्याला मागे खेचत असतात |मी मात्र प्रतेकाला मदतीचा आधार देत आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||ठरवलेले नियम कोणी मनापासून पाळत नाही | शिकण्यासाठी donetion चे रेट कधीच ढळत नाही | भ्रष्टाचाराची कीड आज चांगुलपणाला पोखरत आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||खरच वाटत आता तरी मनुष्याने सुधरायला हव |स्वतः साठी थोड, थोड दुसऱ्यांसाठी जगायला हव |निस्वार्थी असा संस्कारांची या जगाला खूप गरज आहे | घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||स्वतःपुरता विचार करण्याचा तसा प्रतेकाला अधिकार आहे |पण दुसऱ्याला मारून जगन, हा कुठल्या जगाचा न्याय आहे?स्वतःपुरत जगुनही दुसऱ्यांना जीवन शिकवायचं आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||
Saturday, April 23, 2011
वेडात मराठे वीर दौडले सात !!
“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
- कुसुमाग्रज.
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
- कुसुमाग्रज.
Saturday, February 12, 2011
आम्ही नोकरीवाल्या
कुचंबणा, कुचंबणा, कुचंबणा आणि केवळ कुचंबणा. हेच जर नोकरी स्त्रिच्या लग्नानंतरच फ़लित असेल तर "नको तो संसार एकटच कुठेतरी दूर जाऊन संन्यास घ्यावा, एकांतात अगदी एकटच राहून जीवन काढावं" किंवा हे जिवनच नको असं म्हणणाय्रा कितीतरी स्त्रिया जवळजवळ नोकरी करणाय्रांमध्ये किमान १० स्त्रियांमागे ७ स्त्रिया असतात. याचा अर्थ काय? परत एकदा स्त्रिया भरडल्या जात आहेत. फ़रक एवढाच कि क्षेत्र किंवा स्वरुप बदललेल आहे.
स्त्रीने नोकरी करावी का नाही? याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असत. ते परिस्थितीवर व विचारसरणीवर अवलंबून असतं. बय्राच वेळा ते तिच्या स्वत:वरही असतं.
आज प्रगतीसाठी आकाशही ठेंगण पडत असताना तिने घरात बसण. हे शक्यच नाही. किंबहूना तिच्यामध्ये खरी प्रगतीची बिजे आहेत. आज जवळजवळ सगळीच क्षेत्रे तिने काबीज केली आहेत.
तुज पंख दिले देवाने
कर विहार गगणावरती !
देवाने तिला बुध्दीमत्ता दिली आहे, त्याच बरोबर सहनशिलता, प्रेमळ अंतकरणही दिले आहे. त्या जोरावर तिने आकाश, पाताळ, जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवलाही आहे.
पण स्त्रियांवर एकीकडे कौतुकाचा वर्षाव होतो, तर एकीकडे ति भरडली जाते. 9 - 5 ऑफ़िसमध्ये काम करणारी स्त्री सगळ्यानांच खुप सुखी, आनंदी वाटते. पण 8.30 वाजता ति ऑफ़िसला येते म्हणजे तिला सकाळी 8 - 8.३० ला घर सोडावेच लागते, किंबहुना काहींना याच्यापेक्षाही लवकर. तेही घरातली सगळी कामं उरकून. काही राहील नाही ना याची वारंवार खात्री करुन घ्यावी लागते. सकाळी ५-६ ला उठून ९ पर्यंत म्हणजे ३-४ तासात तिला दिवसभराचं सगळं घरकामं करायच असतं. सगळ्यांचे लाड, हट्ट पुरवायचे शिवाय ऑफ़िसला येताना जेव्हा तिचं मुल आई ऑफ़िसला जाणार म्हणजे दिवसभर नसणार म्हणून तिच्याकडे केविलवाणे बघते व तिला आज जावू नकोस ना ! म्हणून सांगते तिच्याकडे हट्ट धरते तेव्हा तिची घायाळ हरिणीसारखी होणारी स्थिती कुणालाच दिसत नाही. त्या इवल्याशा चिमण्या जिवाला घरी सोडून जाणं तिच्या किती जिवावर येतं. दिवसभर तिच्या डोळ्यासमोर त्याचा इवलासा चेहरा दिसतो तेव्हा तिला किती त्रास होत असेल ह्याचा कुणी विचारही करत नाही. उलट दिवसभर बाहेर असते म्हणून तिच्या नोकरीवरच आक्षेप घेतला जातो.
आता मला सांगा एवढसं मुल सोडून कुणालाही नोकरीवर जाण्याची हौस नसते. तर ति गरज आहे. कारण आजकालच्या या महागाईच्या जमाण्यात पुरुष एकटा सगळं कसं चालवू शकेल का ? मुलांना उज्ज्वल भवितव्य द्यायचे असेल, चांगले शिक्षण द्यायचे असेल, त्यांना आपल्यासारखा जगण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, व सर्व सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात व आपल्यामधल्या कलागुणांचा विकास व्हावा, म्हणून दोघांनी मिळून काम केलं पाहिजे, म्हणून ति नोकरी करत असते ना ?
बाहेरच्यांच जाऊ दे पण घरातल्याचं काय ? ति घरातल्यांसाठी त्यांचा गरजा पुर्ण व्हाव्यात म्हणून राब-राब राबते. पण त्यांच्यालेखी तिच्या कष्टांना काहीच किंमत नाही. का तर चकाचक ऑफ़िसमध्ये खुर्चीवर जाऊन बसते, थंडगार ए.सी मध्ये चहा घेते, चांगले चांगले कपडे घालते, म्हणजे ति त्या ए.सी असलेल्या ऑफ़िसमध्ये जाऊन काहीच काम करत नसेल का ? तिला फ़ुकटच पगार मिळत असेल का? आजकाल सख्खा भाऊ भावाला एक रुपया सोडत नाही. मग तो कंपणीचा मालक काय दानशूर कर्ण लागून गेलाय का ? की काही काम न करता फ़ुकट पगार देईल. आणि ते ठिक आहे पण त्याच कंपण्यात पुरुषसुध्दा काम करतात, त्यांना बाहेरचं काम काय असतं किती असतं हे माहीत असतं, तरी घरी आल्यावर आपल्या बायकोने काहीच काम केलं नाही ति बाहेर जाऊन सागरगोटे खेळून आलीय व आपण खुप मोठा डोंगर फ़ोडून आलोय या अर्विभावात सोफ़्यावर लोळत, टिव्ही बघत एक एक आज्ञा देत असतात. व नम्र सेवकाने/ बायकोने कुरकुर न करता व पटापट त्या ऎकल्या पाहीजेत हि अपेक्षा असते. म्हणजेच घरात आपण पैसे न देता स्वत:च पैसे देणारी कायमस्वरुपी कामवाली मिळाल्यासारखं वागवत असतात.
आता इकडे बघा. आपल्याला जेवढं काम आहे तेवढंच काम सोबत असणाय्रा स्त्रि सहकाय्राला असतं हे माहित असूनही तिला ऑफ़िसमध्ये कमी लेखतात. तिला घरची सगळी काम उरकून यायला किंवा कधी बस चुकली म्हणून किंवा कधी इतर काही कारणांमुळे उशीर होतो तेव्हा झाली लगेच त्यावर चर्चा, लगेच लेटमार्क लावला जाणार. कधी मन मोकळं करण्यासाठी त्या दोघी बोलत असतील तर झालं त्यांना लगेच बोलायला सुरुवात करणार. कधी मुलांना बर नाही म्हणून लवकर गेल तर त्यावर लेक्चर ऎकाव लागत. आणि घरी नाही गेलं तर इकडे हिचा जिव तुटर असतो.
म्हणजे बघा ना ! घरी जरा कुठे कमी पडली तर घरचे बोलणार व ऑफ़िसमध्ये काही कमी-जास्त झाले तर ऑफ़िसमधले बोलणार. स्त्रि साठी खरी तर हि दोन विश्वच असतात. पण दोन्ही ठिकाणी जर कुचंबणा होत असेल, ति भरडून निघत असेल तर नको हे जिवण आता संन्यास घ्यावा व दूर निघून जावं असचं ति म्हणणार ना ?
तिने कधीच स्वत:चा विचार केला नाही, स्वत:च्या मताची किमंत केली नाही, स्वत:चा मनाचा कौल घेतला नाही व स्वत:च्या इच्छांना नेहमीच पायदळी तुडवलं कधी बाहेरच्यांसाठी तर कधी घरातल्यांसाठी. हेच आणि असचं जिवन जर एखाद्या सुशिक्षीत, उच्च शिक्षीत स्त्रिचं असेल तर अडाणी, गावंंढळ म्हणून जगणचं चांगलच ना. कारण त्यामुळे आता जेवढा त्रास तिला होतोय तो तर झाला नसता.
हि मुलगी आज कितीतरी जणीचं प्रतिनिधित्व करत आहे, आज प्रत्येक स्त्रियांना या परिस्थितीला समोरे जाव लागतं आहे. ह्या लिखानाचा माझा उद्देश कुठलेही ऑफ़िस किंवा कुणाच्याही घराच्यांवर आरोप करण्याचा नाही. तर असा आहे की आज समाजातील जास्तीत जास्त स्त्रिया या नोकरी करणाय्रा आहेत. तेव्हा ति स्त्रि आपली कुणीतरी आहे, कुणाची बायको, मुलगी, बहीण, आई तसेच ति एक संवेदनशील व्यक्ती आहे. तिच्याकडे फ़क्त इंजिन म्हणून न बघता ति लवचीक, प्रेमळ, वात्सल्यमयी, सहनशील आहे. तिला घराच्यांकडून प्रेमाचे चार शब्द व प्रोत्साहनाचा हात हवाय तर ऑफ़िसच्यांकडून आपुलकीचे चार बोल व मदतीची अपेक्षा आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाने जर ठरवून खरचं मनापासून प्रयत्न केले तर तिला खरचं एक मानाच स्थान मिळेल. जर ति समाधानी, आनंदी असेल तर निश्चित घराचा व समाजाचा विकास होईल, तिला आनंदी ठेवा आणि बघा तिच्या खळखळून हसण्याने अवघं विश्व आनंदाने बहरून जाईल. सारी सृष्टी परत नव्या नवरीसारखी हिरवीसुंदर वाटायला लागेल. तिच्या प्रेमळ बोलांनी पाषाणालाही पाझर फ़ुटतो, तिच्या स्पर्शाने परीसाचेही सोने होते तिला तुम्ही हात द्या जमेल नसेल कृपया ओढू नका. तिची प्रगती लांबूनच बघत रहा.
मी अंगणातील जाई, मी तुझीच रे आई
जाते सोडूनी जेव्हा तुजला, होते भेटण्याची घाई
दिवसरात्र ही तुझ्याचसाठी लढते ही लढाई
येईन जेव्हा धावत तेव्हा म्हणशील कारे हळूच आई.
सुखी असू दे घरकुल माझे नमीते देवा तुझ्याचठाई ||
स्त्रीने नोकरी करावी का नाही? याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असत. ते परिस्थितीवर व विचारसरणीवर अवलंबून असतं. बय्राच वेळा ते तिच्या स्वत:वरही असतं.
आज प्रगतीसाठी आकाशही ठेंगण पडत असताना तिने घरात बसण. हे शक्यच नाही. किंबहूना तिच्यामध्ये खरी प्रगतीची बिजे आहेत. आज जवळजवळ सगळीच क्षेत्रे तिने काबीज केली आहेत.
तुज पंख दिले देवाने
कर विहार गगणावरती !
देवाने तिला बुध्दीमत्ता दिली आहे, त्याच बरोबर सहनशिलता, प्रेमळ अंतकरणही दिले आहे. त्या जोरावर तिने आकाश, पाताळ, जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवलाही आहे.
पण स्त्रियांवर एकीकडे कौतुकाचा वर्षाव होतो, तर एकीकडे ति भरडली जाते. 9 - 5 ऑफ़िसमध्ये काम करणारी स्त्री सगळ्यानांच खुप सुखी, आनंदी वाटते. पण 8.30 वाजता ति ऑफ़िसला येते म्हणजे तिला सकाळी 8 - 8.३० ला घर सोडावेच लागते, किंबहुना काहींना याच्यापेक्षाही लवकर. तेही घरातली सगळी कामं उरकून. काही राहील नाही ना याची वारंवार खात्री करुन घ्यावी लागते. सकाळी ५-६ ला उठून ९ पर्यंत म्हणजे ३-४ तासात तिला दिवसभराचं सगळं घरकामं करायच असतं. सगळ्यांचे लाड, हट्ट पुरवायचे शिवाय ऑफ़िसला येताना जेव्हा तिचं मुल आई ऑफ़िसला जाणार म्हणजे दिवसभर नसणार म्हणून तिच्याकडे केविलवाणे बघते व तिला आज जावू नकोस ना ! म्हणून सांगते तिच्याकडे हट्ट धरते तेव्हा तिची घायाळ हरिणीसारखी होणारी स्थिती कुणालाच दिसत नाही. त्या इवल्याशा चिमण्या जिवाला घरी सोडून जाणं तिच्या किती जिवावर येतं. दिवसभर तिच्या डोळ्यासमोर त्याचा इवलासा चेहरा दिसतो तेव्हा तिला किती त्रास होत असेल ह्याचा कुणी विचारही करत नाही. उलट दिवसभर बाहेर असते म्हणून तिच्या नोकरीवरच आक्षेप घेतला जातो.
आता मला सांगा एवढसं मुल सोडून कुणालाही नोकरीवर जाण्याची हौस नसते. तर ति गरज आहे. कारण आजकालच्या या महागाईच्या जमाण्यात पुरुष एकटा सगळं कसं चालवू शकेल का ? मुलांना उज्ज्वल भवितव्य द्यायचे असेल, चांगले शिक्षण द्यायचे असेल, त्यांना आपल्यासारखा जगण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, व सर्व सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात व आपल्यामधल्या कलागुणांचा विकास व्हावा, म्हणून दोघांनी मिळून काम केलं पाहिजे, म्हणून ति नोकरी करत असते ना ?
बाहेरच्यांच जाऊ दे पण घरातल्याचं काय ? ति घरातल्यांसाठी त्यांचा गरजा पुर्ण व्हाव्यात म्हणून राब-राब राबते. पण त्यांच्यालेखी तिच्या कष्टांना काहीच किंमत नाही. का तर चकाचक ऑफ़िसमध्ये खुर्चीवर जाऊन बसते, थंडगार ए.सी मध्ये चहा घेते, चांगले चांगले कपडे घालते, म्हणजे ति त्या ए.सी असलेल्या ऑफ़िसमध्ये जाऊन काहीच काम करत नसेल का ? तिला फ़ुकटच पगार मिळत असेल का? आजकाल सख्खा भाऊ भावाला एक रुपया सोडत नाही. मग तो कंपणीचा मालक काय दानशूर कर्ण लागून गेलाय का ? की काही काम न करता फ़ुकट पगार देईल. आणि ते ठिक आहे पण त्याच कंपण्यात पुरुषसुध्दा काम करतात, त्यांना बाहेरचं काम काय असतं किती असतं हे माहीत असतं, तरी घरी आल्यावर आपल्या बायकोने काहीच काम केलं नाही ति बाहेर जाऊन सागरगोटे खेळून आलीय व आपण खुप मोठा डोंगर फ़ोडून आलोय या अर्विभावात सोफ़्यावर लोळत, टिव्ही बघत एक एक आज्ञा देत असतात. व नम्र सेवकाने/ बायकोने कुरकुर न करता व पटापट त्या ऎकल्या पाहीजेत हि अपेक्षा असते. म्हणजेच घरात आपण पैसे न देता स्वत:च पैसे देणारी कायमस्वरुपी कामवाली मिळाल्यासारखं वागवत असतात.
आता इकडे बघा. आपल्याला जेवढं काम आहे तेवढंच काम सोबत असणाय्रा स्त्रि सहकाय्राला असतं हे माहित असूनही तिला ऑफ़िसमध्ये कमी लेखतात. तिला घरची सगळी काम उरकून यायला किंवा कधी बस चुकली म्हणून किंवा कधी इतर काही कारणांमुळे उशीर होतो तेव्हा झाली लगेच त्यावर चर्चा, लगेच लेटमार्क लावला जाणार. कधी मन मोकळं करण्यासाठी त्या दोघी बोलत असतील तर झालं त्यांना लगेच बोलायला सुरुवात करणार. कधी मुलांना बर नाही म्हणून लवकर गेल तर त्यावर लेक्चर ऎकाव लागत. आणि घरी नाही गेलं तर इकडे हिचा जिव तुटर असतो.
म्हणजे बघा ना ! घरी जरा कुठे कमी पडली तर घरचे बोलणार व ऑफ़िसमध्ये काही कमी-जास्त झाले तर ऑफ़िसमधले बोलणार. स्त्रि साठी खरी तर हि दोन विश्वच असतात. पण दोन्ही ठिकाणी जर कुचंबणा होत असेल, ति भरडून निघत असेल तर नको हे जिवण आता संन्यास घ्यावा व दूर निघून जावं असचं ति म्हणणार ना ?
तिने कधीच स्वत:चा विचार केला नाही, स्वत:च्या मताची किमंत केली नाही, स्वत:चा मनाचा कौल घेतला नाही व स्वत:च्या इच्छांना नेहमीच पायदळी तुडवलं कधी बाहेरच्यांसाठी तर कधी घरातल्यांसाठी. हेच आणि असचं जिवन जर एखाद्या सुशिक्षीत, उच्च शिक्षीत स्त्रिचं असेल तर अडाणी, गावंंढळ म्हणून जगणचं चांगलच ना. कारण त्यामुळे आता जेवढा त्रास तिला होतोय तो तर झाला नसता.
हि मुलगी आज कितीतरी जणीचं प्रतिनिधित्व करत आहे, आज प्रत्येक स्त्रियांना या परिस्थितीला समोरे जाव लागतं आहे. ह्या लिखानाचा माझा उद्देश कुठलेही ऑफ़िस किंवा कुणाच्याही घराच्यांवर आरोप करण्याचा नाही. तर असा आहे की आज समाजातील जास्तीत जास्त स्त्रिया या नोकरी करणाय्रा आहेत. तेव्हा ति स्त्रि आपली कुणीतरी आहे, कुणाची बायको, मुलगी, बहीण, आई तसेच ति एक संवेदनशील व्यक्ती आहे. तिच्याकडे फ़क्त इंजिन म्हणून न बघता ति लवचीक, प्रेमळ, वात्सल्यमयी, सहनशील आहे. तिला घराच्यांकडून प्रेमाचे चार शब्द व प्रोत्साहनाचा हात हवाय तर ऑफ़िसच्यांकडून आपुलकीचे चार बोल व मदतीची अपेक्षा आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाने जर ठरवून खरचं मनापासून प्रयत्न केले तर तिला खरचं एक मानाच स्थान मिळेल. जर ति समाधानी, आनंदी असेल तर निश्चित घराचा व समाजाचा विकास होईल, तिला आनंदी ठेवा आणि बघा तिच्या खळखळून हसण्याने अवघं विश्व आनंदाने बहरून जाईल. सारी सृष्टी परत नव्या नवरीसारखी हिरवीसुंदर वाटायला लागेल. तिच्या प्रेमळ बोलांनी पाषाणालाही पाझर फ़ुटतो, तिच्या स्पर्शाने परीसाचेही सोने होते तिला तुम्ही हात द्या जमेल नसेल कृपया ओढू नका. तिची प्रगती लांबूनच बघत रहा.
मी अंगणातील जाई, मी तुझीच रे आई
जाते सोडूनी जेव्हा तुजला, होते भेटण्याची घाई
दिवसरात्र ही तुझ्याचसाठी लढते ही लढाई
येईन जेव्हा धावत तेव्हा म्हणशील कारे हळूच आई.
सुखी असू दे घरकुल माझे नमीते देवा तुझ्याचठाई ||
स्वप्न
माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा
माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा
माझ्या अश्रुनांही आता मोल यावे
आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे
जगही लाजेल असे आता घडावे
माझे जिवणगाणे मीच आता आळवावे
प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे
मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे
मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ?
मीच माझे स्वप्न व्हावे...
मीच माझे स्वप्न व्हावे...
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा
माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा
माझ्या अश्रुनांही आता मोल यावे
आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे
जगही लाजेल असे आता घडावे
माझे जिवणगाणे मीच आता आळवावे
प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे
मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे
मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ?
मीच माझे स्वप्न व्हावे...
मीच माझे स्वप्न व्हावे...
Friday, February 11, 2011
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया !!!!!!!!!!!
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया !!!!
झळाळती कोटी ज्योती या – हां – हां हां.
चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र तारे वाजती पैंजण
छुन छुन झुम झुम, हां हां.
झोत रुपेरी भूमिवरी, गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हां हां.
आनंदून रंगून, विसरुनि देहभान
मोहरली सारी काया हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून प्राणज्योती मेळवून
एक होऊ या, हां हां.
झळाळती कोटी ज्योती या – हां – हां हां.
चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र तारे वाजती पैंजण
छुन छुन झुम झुम, हां हां.
झोत रुपेरी भूमिवरी, गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हां हां.
आनंदून रंगून, विसरुनि देहभान
मोहरली सारी काया हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून प्राणज्योती मेळवून
एक होऊ या, हां हां.
गर्जते मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी.. स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी
Subscribe to:
Posts (Atom)
