म्हणतात ना कि देव सर्व ठिकाणी नसू शकतो म्हणूनचं कदाचित त्याने आई हे चरित्र निर्मित केले असावे. यात खरचं काहीचं चूकीचे नाही. फक्त आई म्हणल्यावरचं असं वाटायला लागतं की सर्व चिंता निसरल्या. आईचं काय महत्व असतं हे मला तेव्हा पर्यंत माहित नव्हते जेव्हा पर्यंत मी तिचापासून लांब गेले नव्हते. आणि जरा लांब झाले आणि खरोखर तिचं माया कळून आली.
लांब व्हायचे कारण काय तर लग्न. एक मुलीच्या जीवनातली सर्वात मोठी तडजोड. आम्ही एका गावात असून देखील तिची आठवण आली की मी ढसाढसा रडायची. ती माझ्याहून खूप लांब नव्हती, मला तिला खूप भेटायचं इच्छा देखील होत नव्हते पण तिचा आठवणीत मी खूप रडायचे. कारण मला आता जाणवयाचे की तिचा पूरेपूर साथ आता मिळणे अशक्य. मुली ला सासरी पाठवले की ती त्यांची मुलगी झाली, असे जरी ती म्हणतं असे पण हे देखील तोंडदेखले होतं.
कोणी किती ही प्रेम दिले तरी आईची माया ती आईची चं असते. तिचे ते रागवून जेवू घालणे, आवडीचे नसल्यावर नवं काही बनवून देणे, मैत्रीणिंबरोबर सिनेमाला जाण्यासाठी बाबांची परवानगी मिळवून देणे, काही हट्टं धरल्यास तडजोड करून ही ती वस्तु आणून देणे, प्रेमाने माझ्या जवळ बसून दिवसभरात घडलेल्या तिला बोर वाटतं असल्या तरी सर्व गोष्टी ऐकणे आणि भावाशी भांडण झाल्यास माझा पक्ष मांडणे हे अगदी खरोखर तिला जमायचे. माझा मनातल्या गोष्टी कधीचं तिला सांगण्याची गरज भासलीचं नाही.
आज देखील खरोखर कधी-कधी वाटतं की पळून आई जवळ जावं आणि तिचा मांडीत डोके ठेवून खूप गप्पा माराव्या. आणि तिच्याकडे काही विशेष खाण्याची मागणी करावी. अजून ही मला आईकडून शिकलेले काही पदार्थ बनवले की सर्वांना खूप आवडतात पण मला मनात कुठे तरी खटकतं असतं की नाही गडे यात आईच्या हाथाची मुलीचं चवं आलेली नाही.
अजून ही आठवतं जेव्हा मी आईच्या मनाविरूद्ध वागायचे आणि ती खोटंखोटं का होय ना माझ्याशी नाराज व्हायची तर मी पटकन एखाद्या लहान पोरासारखी तिच्या मांडीवर जाऊन बसायचे आणि जेव्हा पर्यंत ती हसत हसत माझ्याशी बोलायची नाही तेव्हा पर्यंत मी तिला वेडवाकडे तोंड करून हसवण्याचा प्रयत्न करत राहयची. ही लाडी-गोडी जेव्हा मला तिच्याकडून काही मिळवायचे असले की पण चालायची. तिला लगेच कळायचे की आज काय नवीन आता?
हे सगळं आठवलं की असं वाटतं की आता कोणाकडे मी जिद करायची, कोणच्या मांडीवर डोके ठेवून आपल्या मनातल्या गाठी सोडवायच्या, मी चिडल्यावर कोणं आहे मला समझून घेणारे. माझी आई मला नेहमी म्हणायची कगं तुझं सगळ्यांशी पटतं मग काही बिनसलं की तु माझ्या वर का बरं अपला राग काढते?
आणि मी तेव्हां रागात असले तरी तिला नेहमी एकचं उत्तर देयचे.... तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम आणि हक्क आहे ना माझं म्हणूनचं.
आता पुन्हा एकदा आईचे महत्व कितपत आहे ते कळून आले आहे. कारण आता मी देखील या पदावर पोहचली. निश्चितचं हे पाहून माझ्या आईला माझ्यापेक्षा नक्कीचं जास्त आनंद झाले असणार.
No comments:
Post a Comment